– नितीन चंद्रकांत चारेकर
आज अनेक वृद्ध मनात एक खंत बाळगून असतात.
“मुलं आपली राहिली नाहीत.”
“आमच्या वेळी असं नव्हतं.”
“आता कुणाला वेळच नाही.”
ही भावना खरी आहे. वेदना खरी आहे.
पण प्रश्न असा आहे — या वेदनेतून पुढे काय?
आजचं जग झपाट्याने बदलतंय. नोकऱ्या बदलल्या, शहरं बदलली, जगण्याची घडी बदलली. पूर्वी एकाच घरात चार पिढ्या राहत होत्या; आज अनेकदा एकाच शहरातही सगळे एकत्र नसतात. हे बदल चांगले की वाईट — हा वेगळा प्रश्न. पण ते आहेत, हे नाकारून चालणार नाही.
अनेकदा आपण असं म्हणतो — “पुढची पिढी स्वार्थी झाली.”
पण थोडा विचार केला तर दिसतं —
ती स्वार्थी नाही, ती अडकलेली आहे.
वेळेत, जबाबदाऱ्यांत, स्पर्धेत.
आणि अशा वेळी, आपण जर सतत तक्रारीच करत राहिलो,
तर दुरावा वाढतो.
संवाद तुटतो.
आणि नातं हळूहळू फक्त औपचारिक उरतं.
मग पर्याय काय?
पहिली गोष्ट — स्वतःची भूमिका बदलणं.
वृद्धत्व म्हणजे फक्त “आम्ही खूप केलंय” असं सांगणं नाही.
ते खरं आहेच.
पण आता प्रश्न आहे — आता आपण कसं वागतो?
संशोधन स्पष्ट सांगतं —
ज्या वृद्धांनी स्वतःला “हताश – आता काही उपयोग नाही” असं मानलं,
त्यांचं मन लवकर खचतं.
पण जे म्हणतात —
“मी अजूनही काही देऊ शकतो,”
“माझा अनुभव कुणाला उपयोगी पडू शकतो,”
ते अधिक समाधानी राहतात.
दुसरी गोष्ट — अपेक्षा कमी, संवाद जास्त.
आपण अनेकदा न सांगता अपेक्षा ठेवतो.
मुलांनी फोन करावा, भेट द्यावी, विचारपूस करावी…
पण त्यांनाही मन आहे, ताण आहे, आयुष्य आहे.
एक साधा प्रश्न विचारून पाहा —
“तू हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे?”
सल्ला देण्याआधी ऐकून घ्या.
तुलना करू नका — “आमच्या वेळी…”
कारण त्यांचा काळ वेगळा आहे.
तिसरी गोष्ट — स्वतःचं जग वर्तुळ वाढवा.
सगळं आयुष्य मुलांभोवतीच फिरत राहिलं,
तर तीच एकमेव अपेक्षा बनते.
आणि ती पूर्ण झाली नाही, की दुःख वाढतं.
मित्र, शेजारी, गट, वाचन, सेवा, छंद —
हे सगळं लक्झरी नाही,
ही गरज आहे.
वृद्धत्वात जर आपलं स्वतःचं सामाजिक आयुष्य असेल,
तर मुलांची अनुपस्थिती टोचत नाही —
कारण आयुष्य रिकामं राहत नाही.
चौथी आणि महत्त्वाची गोष्ट — स्वतः जबाबदारी स्वीकारणे
सगळं त्यांचच चुकतंय, पण आपलं काहीच नाही —
असा विचार मनाला सोपा वाटतो.
पण तो नात्यांना अवघड करतो, संबंधातील माधुर्य घालवतो.
कधी आपण जास्त कडक होतो का?
कधी सतत टोचुन बोलतो का?
कधी नकळत भावनिक दबाव टाकतो का?
हे प्रश्न स्वतःला विचारणं म्हणजे स्वतःला कमी लेखणं नाही.
उलट, ही परिपक्वतेची खूण आहे.
शेवटी एकच सांगावंसं वाटतं —
पुढची पिढी बिघडलेली नाही.
ती वेगळी आहे.
आणि जर आपण थोडं वाकून,
थोडं ऐकून,
थोडं बदल स्वीकारून पुढे गेलो,
तर नात्यांमध्ये पुन्हा ऊब येऊ शकते.
तक्रारीपेक्षा जुळवून घेणं कठीण असतं.
पण ते करण्यातच खरं शहाणपण आहे.
वृद्धत्व म्हणजे केवळ अपेक्षा ठेवण्याचा हक्क नाही,
तर समजून घेण्याची जबाबदारीही आहे.
(नितीन चंद्रकांत चारेकर हे छत्रपती संभाजीनगर मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि आस्था फाउंडेशन औरंगाबाद या संस्थेचे विश्वस्त आहेत)
100% बरोबर. आपणच आपल्या मुलांना समजून उमजून वागले पाहिजे. परिवर्तन स्वीकारले पाहिजे. पुढील पिढीची घुसमट विचारात घेतली पाहिजे. कारण त्यांचे सुख, त्यांचा आनंद आपले समाधान करणारा असावा. समवयस्कांमध्ये रमावे. काही सामाजिक उपक्रमांना आपल्यासारख्या ज्येष्ठांचे अनुभव उपयोगी येतात, अशा ठिकाणी सहभाग घ्यावा, असे मला वाटते. 🙏
उज्ज्वला ताई,
धन्यवाद!
Realization for me for corrections in mindset, little bit tougher but need of the hour.
मेघा ताई,
धन्यवाद!
Need of the hour for me to change mindset.
Very true facts sir. All elders should be practical. Adjust to present life without any expectations. Not to compare the past to present n future. Learn not to hurt anybody, ready to surrender for the best future.
We should behave like water. जिसमे मिलाये जाये वह रंग जयसा. Remember, no regret, accept to face ups and downs for content life.
This is my personal feeling.
Lastly, do one good work every day in life, at least with minimum a SMILE to stranger
Experience n share.
🙏🙏
Vijay ji,
धन्यवाद!
Absolutely
हेमंत सर,
धन्यवाद!
खरे आहे स्वतःला बदलणे ही काळाची गरज आहे खूप छान लिहिले.
अनंत जी,
धन्यवाद!
Very insightful, adopting to changing environment and understanding it, is very important. Regards
उल्हास जी,
धन्यवाद!
आजच्या वृद्धांच्या च्या भावना अगदी योग्य शब्दात मांडल्या नितीन सर तुम्ही. मला असे वाटते ,आपली पिढी ही मागच्या पिढीशी जुळवून घेण्यात आणि आपल्या पुढच्या पिढीशी सुसंवाद साधण्यात तरबेज झाली आहे. आपण आपल्या लेकरांना वेगवेगळ्या फिल्डवर लढताना बघत आहोत. आणि वाटतं आपल्या पिढीला कष्ट होते परंतु ओढाताण नव्हती, स्पर्धा नव्हती. जी आपल्या पुढच्या पिढीच्या वाट्याला आली आहे. जग रहाटी बरोबर जर ते चालले नाहीत तर ते मागे पडतील हे आपल्याला कळत आहे आणि म्हणूनच आपण त्यांना त्यांच्या चालीने जीवन जगू दिले पाहिजे. घारी सारखे दुरून लक्ष देऊन जेव्हा आवश्यक आहे तेव्हा त्यांना आपल्या अनुभवांच्या भक्कम पाठिंबा देऊन तू लढ मी आहे तुझ्याबरोबर हा विश्वास दिला पाहिजे. आणि मला वाटतं आपली पिढी हे करत आहे आणि म्हणूनच आपली पिढी आपलं आयुष्य आता आपल्या मनासारखे , आनंदात, समाधानात जगत आहे हे पाहून आपली मुले ही सुखावत आहेत. बाकी तुमची शब्द रचना अतिशय उत्कृष्ट झाली आहे . तुमची पोस्ट खुप भावली मनाला.
जयश्री ताई,
तुम्ही एका महत्त्वाच्या गोष्टी कडे लक्ष वेधले आहे.
धन्यवाद!
नितीन सर खूप छान विचार मांडलेत तुम्ही.
Thanks Dr. Girish ji.
नितीन, तुझे विचार योग्य आहेत. तू आस्था फाउंडेशनचे छान काम करीत आहेस. खूप खूप शुभेच्छा.
Thanks Madhusudan ji
सर खूप छान व चांगले विचार मांडले तुम्ही
Thanks Hemant ji.
Disclaimer: WisdomStays is a discovery platform that lists eldercare facilities across India based on information provided directly by the respective facility owners or managers. While we strive to ensure that the details shared are accurate and up to date, we do not independently verify, endorse, or guarantee the services, quality, or compliance of any facility listed on our platform. WisdomStays is not liable for any deficiencies in service, experience, medical care, or infrastructure offered by these facilities. Users are strongly advised to conduct their own due diligence, visit the facility, and speak with the management before making any decisions. If you notice any outdated or incorrect information, please write to us — we will review and update it within 7 working days. This website is independently managed and is not affiliated with or endorsed by any government authority or agency.
Umesh gadigayya hiremath
February 1, 2026 at 4:31 amAccording to changes, irrespective of age, caste, creed, colour,profession, each one of us should get attuned to “change”. Change is positive generator. It always pays. To the extent possible everyone must adopt changes to lead a satisfied life coupled with with contribution selflessly to be grateful to this earth as all the amenities, essentials for mankind hv been derived/fetched from mother earth.
नितीन चंद्रकांत चारेकर
February 2, 2026 at 2:53 amUmesh ji, Thanks for sharing your perspective.